Breaking News
Home / बॉलीवुड / आशुतोष राणाची बायको आहे हि लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री

आशुतोष राणाची बायको आहे हि लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री

अभिनेता आशुतोष राणा हा बॉलिवूडचा एक गुणवान कलाकार म्हणून ओळखला जातो. त्याने अनेक चित्रपटांत आपल्या नकारात्मक भूमिकेने प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. आशुतोष राणा ह्याची पत्नी बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणे आहे. ‘हम आप के है कौन’ चित्रपटामुळे रेणुका शहाणे प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. दोघांचे लग्न २००१ साली झाले. परंतु त्यांच्या प्रेमाची कहाणी खूपच मनोरंजक अशी आहे. केव्हा दोघांची ओळख झाली, कसा आशुतोषने रेणुकाचा नंबर मिळवला आणि कसे रेणुकाला इम्प्रेस केले ज्यामुळे रेणुकाने स्वतःहून आशुतोषला त्याच्यावर प्रेम असल्याचे सांगितले. चला तर आजच्या लेखात आपण त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल जाणून घेऊया. १९९८ ची गोष्ट आहे, हंसल मेहता ह्यांनी ‘जयते’ नावाचा चित्रपट बनवला होता. त्या चित्रपटाच्या ट्रायलसाठी आशुतोष राणाला बोलावले होते. त्यावेळी आशुतोष राणा ह्यांना एकटे जायचे मन नव्हते. म्हणून त्यांनी गायिका राजेश्वरी सचदेव ज्या त्यावेळी आशुतोष राणाची चांगली मैत्रीण होती, तिला सुद्धा सोबत यायला सांगितले. दोघेही एकत्र गेले.

तिथेच रेणुका शहाणे ह्यांना सुद्धा प्रोड्युसरने चित्रपटाचा ट्रायल पाहण्यासाठी बोलावले होते. रेणुका हि राजेश्वरी सचदेवची चांगली मैत्रीण होती. राजेश्वरीने रेणुका आणि आशुतोष ह्यांची ओळख करून दिली. रेणुकाचा त्याअगोदर ‘हम आपके है कौन’ हा चित्रपट लोकप्रिय झाला होता, त्यामुळे आशुतोषला तिच्या अभिनयाबद्दल माहिती होते. परंतु रेणुकाने आशुतोषचे काम पाहिले नव्हते. जेव्हा राजेश्वरीने आशुतोषची ओळख एक अभिनेता म्हणून करून दिली तेव्हा तिने ते दाखवलं नाही कि मी तुमचे कोणते काम वैगेरे पाहिले नाही वैगेरे. त्याने त्याच्या ‘दुश्मन’ चित्रपटाचे नाव सांगितले. तिने ऐकले होते कि एका चित्रपटाची चर्चा होती, परंतु तिने तो पाहिला नव्हता. त्यानंतर दोघांची ओळख झाली. त्यांनी जवळपास अर्धा तास सिनेमावर गप्पा मारल्या. गप्पा मारताना रेणुकाच्या साधेपणाने आशुतोषला प्रभावित केले. पहिल्या भेटीतच रेणुकाने आशुतोषच्या मनात घर केले. त्यावेळी ते जुहूला चित्रपटाचा ट्रायल पाहत होते.

जेव्हा जाण्याची वेळ आली तेव्हा आशुतोष म्हणाला कि, चला मी तुम्हाला सोडतो. रेणुका दादरला राहायची. तेव्हा तिने विचारले तुम्ही कुठे राहतात. तेव्हा आशुतोष म्हणाला कि मी चेंबूरला राहतो. चेंबूर आणि दादर परस्पर उलट मार्ग पडतो. तेव्हा रेणुकाने सांगितले कि आशुतोषजी मी मुंबईत लहानाची मोठी झाली आहे आणि मी असा कोणता रस्ता पाहिला नाही आहे जो जुहूवरुन चेंबूरला जातो दादरमार्गे. तुम्ही काळजी करू नका, मी नीट घरी जाईल, मला सवय आहे. ह्यानंतर ते भेटले नाही. हळूहळू वेळ निघून जात होती. दिवाळी आली. तेव्हा रेणुकाचा एक रवी राय नावाचा बॅरिस्टर साहेब होता. जो रेणुकाला बाईसाहेब म्हणून हाक मारायचा. त्या बॅरिस्टर साहेबांकडून आशुतोषने रेणुकाचा फोन नंबर मागितला, तेव्हा त्याने सांगितले कि बाईसाहेबांना ९ नंतर फोन करू नका, त्या उचलणार नाहीत. जर बेल वाजत राहिली तर व्हॉइस मेसेज सोडावा लागेल. जर तुम्ही मेसेज न पाठवता फोन बंद कराल तर तुम्ही बेशिस्त व्यक्ती मानले जाल. आणि हे त्यांच्यावर आहे कि त्या तुम्हांला कॉलबॅक करतील कि नाही ते. तेव्हा आशुतोषने सांगितले कि, मला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत, ह्यात कोणती मोठी गोष्ट आहे. तेव्हा रवीने त्याला रेणुकाचा घरचा नंबर दिला.

जसे त्याने सांगितलेले तसेच झाले. आन्सरिंग मशीन वाजली, तेव्हा अशोतोष ने व्हॉइस मेसेज पाठवला कि मी आशुतोष राणा आहे, तुम्हांला दिवाळीच्या शुभेच्छा. आणि त्याने स्वतःचा नंबर सोडला नाही आन्सरिंग मशीनवर. कारण त्याचे मानणे होते कि तिला उत्तर द्यायचे असेल तर ती माझा सुद्धा नंबर माहिती करून घेईल जसे मी तिचा शोधला. पुढच्या दिवशी जेव्हा आशुतोष घरी पोहोचला तेव्हा त्याच्या बहिणीने सांगितले कि, रेणुका शहाणेंचा फोन आला होता. त्यांनी धन्यवाद सांगितले आहे शुभेच्छा दिल्याबद्दल. त्यानंतर आशुतोषने रेणुकाच्या धन्यवादला धन्यवाद करण्यासाठी फोन केला. आन्सरिंग मशीन वाजली. तेव्हा आशुतोषने मेसेज सोडला कि, धन्यवाद दिल्याबद्दल तुमचा खूप आभारी आहे. पुढच्या दिवशी रेणुकाचा जेव्हा पुन्हा फोन आला, तेव्हा आशुतोष शूटिंग वर होता. तेव्हा रेणुकाने त्याच्या बहिणीला सांगितले कि, आशुतोषला माझा मोबाईल नंबर द्या. कारण जेव्हा मी कॉल करते तेव्हा ते नसतात. आणि जेव्हा ते फोन करतात तेव्हा मी नसते. जेव्हा आशुतोषला मोबाईल नंबर मिळाला, तेव्हा त्याने मनात म्हटले कि नंबर स्वतःहून मिळाला बरं झालं, नाहीतर मला कुठून वेगळीकडून सुद्धा मिळाले असते परंतु ते चांगले वाटले नसते.

आशुतोषला आता रेणुकाचा मोबाईल नंबर तर मिळाला होता, परंतु तिचा नियम असा होता कि रात्री ९ नंतर ती फोन उचलत नसे. आणि आशुतोष दिवसभर शूटिंग मध्ये व्यस्त असायचा, त्याचा दिवस रात्री ९ नंतर चालू व्हायचा. त्याने रात्री १० वाजता रेणुकाला फोन केला. आशुतोषने कॉल करण्याअगोदर टेक्स्ट मेसेज पाठवला कि, मी आशुतोष राणा आहे आणि तुम्हांला कॉल करत आहे. रेणुकाने फोन उचलल्यानंतर त्याने ह्या गोष्टीची क्षमा मागितली कि, तुमच्या नियमाविरुद्द मी तुम्हाला फोन केला. त्यांनी जवळजवळ एक सव्वा तास फोनवर गप्पा मारल्या, जसे कि जुने मित्र आहेत. आणि ह्याला रेणुकाला सुद्धा काही हरकत नव्हती. तेव्हा आशुतोषने विचारले कि, ९ नंतर तुम्ही माझ्याशी बोलत आहात. तेव्हा रेणुकाने सांगितले कि, ९ नंतर वेळ माझी स्वतःची असते. मी वाचत असते किंवा आपल्या लोकांशी बोलत असते. तुम्ही माझे मित्र आहेत, ह्यामुळे तुमच्याशी बोलत आहे. माझ्या वेळेचा मी माझ्या हिशोबाने वापर करते. आणि आता तुम्ही ह्यापुढेही १० नंतर कॉल करू शकता. त्यानंतर दोघेही जवळजवळ दीड महिने फोनवर बोलायचे. ते भेटले नाही. ते कधीकधी रात्री दोनदा किंवा तीनदा फोन वर गप्पा मारत. कधीकधी रात्री १ वाजता फ्री असेल तेव्हा गप्पा मारत. फोनवर बोलता बोलता डिसेंबर चा महिना आला. रेणुकाची गोव्यात ‘अंताक्षरी’ची शूटिंग चालू होती. तेव्हा आशुतोष ‘जानवर’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैद्राबाद मध्ये होता.

तेव्हा त्याने रेणुकाला फोन करून एक कविता ऐकवली. तेव्हा रेणुकाने सांगितले कि, राणा जी, मला वाटते मी तुमच्या प्रेमात पडली आहे. तेव्हा आशुतोषच्या मनात लाडू फुटले. त्यानंतर रेणुकाने सांगितले कि तुम्ही ३१ डिसेम्बरला भेटा, तेव्हा बोलूया. जेव्हा ३१ ला आशुतोष रेणुकाच्या घरी गेला तेव्हा त्याने सुद्धा सांगितले कि माझे सुद्धा तुमच्यावर खूप प्रेम आहे. रेणुका अगोदरपासूनच विवाहित होती, परंतु खूपच कमी काळात तिचे लग्न तुटले होते. ज्यामुळे रेणुका खूप द्विधा मनःस्थितीत होती. परंतु आशुतोषला रेणुकासोबत कोणतीच समस्या नव्हती. आशुतोषला रेणुकाबद्दल सर्व माहिती होते आणि ह्या गोष्टीला आशुतोषची काहीच हरकत नव्हती. रेणुकाची आई दोघांच्या लग्नाबद्दल थोड्या चिंतीत होत्या. ह्यामुळे नाही कि तिच्या मुलीचे दुसरे लग्न होते. तर ह्यामुळे कि आशुतोष मध्यप्रदेशमधील असून त्याच्या कुटुंबात १२ लोकं आहेत. त्यानंतर दोघांनीही त्यांना मनवल्यानंतर त्या लग्नासाठी राजी झाल्या. जवळजवळ दीड वर्षे आशुतोष आणि रेणुकाने एकमेकांना डेट केले. त्यानंतर २५ मे २००१ ला दोघांनी विवाह केला. आता ह्या दोघांनाही शौर्यमान आणि सतेंद्र नावाची दोन मुले आहेत.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *