Breaking News
Home / ठळक बातम्या / रात्री झोपण्याअगोदर ह्या कुटुंबाने केली होती खूप मोठी चूक, संपूर्ण कुटुंबाचा जीव गेला

रात्री झोपण्याअगोदर ह्या कुटुंबाने केली होती खूप मोठी चूक, संपूर्ण कुटुंबाचा जीव गेला

उत्तर भारतापासून ते राजस्थान आणि संपूर्ण देशभरात सध्या थंडीने उद्रेक केला आहे. थंडीने ह्यावर्षी अनेक विक्रम तोडले आहेत. थंडीसोबतच दाट धुकेसुद्धा लोकांच्या जीवांचे शत्रू बनले आहेत. लोकं ह्या वेळी थंडीपासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत आहेत. काही लोकं शेकोटी करतात तर काही लोकं फायरप्लेस लावून आगीचे मजे घेत दरवाजे बंद करून झोपून जातात. फायरप्लेस म्हणजे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी घरामध्येच एका लोखंडाच्या, दगडांच्या किंवा विटांच्या ठराविक भांड्यात किंवा साच्यात आग पेटवणं. हिंदीमध्ये ह्यास ‘अंगीठी’ असे म्हणतात. ज्यामुळे घरात उब निर्माण होते. परंतु हे देशी जुगाड कधी कधी जीवावर सुद्धा बेततात. अश्याच प्रकारची हरियाणाच्या फरिदाबाद येथील दुःखद घटना समोर आली आहे. इथे ह्या कुटुंबाने थंडीपासून बचाव करण्याकरिता फायरप्लेस लावून दरवाजा बंद केला होता, ज्यानंतर सकाळी सर्वांचे मृ’तदेह मिळाले.

हि घटना बुधवारी सकाळी फरिदाबादमधील सेक्टर ५८ मधून प्रकाशात अली आहे. येथील अमन नावाचा व्यक्ती आपली पत्नी प्रिया आणि त्यांचा ६ वर्षाचा मुलगा अमन सोबत भाड्याच्या खोलीत राहत होते. मंगळवारी रात्री ह्या परिसरातील वातावरण खूपच कमी झाले होते, ज्यामुळे थंडी खूप वाढली होती. ह्यामुळे ह्या कुटुंबाने थंडीपासून बचाव करण्यासाठी फायरप्लेस जळवलं. त्यानंतर सर्वजण दरवाजा बंद करून झोपून गेले. घर पूर्णपणे बंद असल्यामुळे धुरामुळे दम गु’दम’रल्यामुळे त्यांचा मृ’त्यू झाला. ह्यानंतर जेव्हा सकाळ झाले तेव्हा अमनच्या खोलीतून कोणत्याही प्रकारची हालचाल न झाल्यामुळे घरमालक सुकेशने त्यांचे दार ठोठावले. त्यानंतर सुद्धा नाही कोणी दरवाजा उघडला आणि नाही कोणी कोणत्या प्रकारचा आवाज केले. ह्यानंतर त्याने खिडकीतून वाकून पाहिले तर संपूर्ण खोलीत धुरच धूर पसरला होता. त्याला लगेच संपूर्ण परिस्थिती लक्षात आली आणि त्याने आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना बोलावले. त्यानंतर घरमालकाने पोलिसांना कळवून घटनास्थळी बोलावले. पोलिसांनी येऊन जेव्हा दरवाजा तोडला तेव्हा तिघांचे मृ’तदेह पलंगावर पडलेले मिळाले.

खरंतर फायरप्लेसच्या धुरामध्ये विषारी वायू असतो, ज्यामुळे मृ’त्यू होतो. ह्या घटनेची माहिती देताना घरमालक सुकेश ह्यांनी सांगितले कि अमन मुळतः बिहारमधील लखीसराय येथील रहिवासी होता. तो इथे सेक्टर २४ मध्ये असलेल्या एक खाजगी कंपनीत कमर्चारी होता. पोलिसांनी अमनच्या बिहार येथील परिवाराला कळवून घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनी तिघांच्या मृ’तदेहांना पोस्टमोर्टमसाठी पाठवून दिले आहे. ह्या घटनेनंतर डॉक्टर्सचे म्हणणे आहे कि लोकांनी विसरूनही हि चूक करू नका. लोकं थंडीपासून बचाव करण्यासाठी फायरप्लेस जळवतात आणि रात्री दरवाजे खिडक्या लावून झोपतात. परंतु ते हे विसरतात कि ह्यात जीवघेणा विषारी वायू असतो, ज्यामुळे मृ’त्यू होऊ शकतो. भारतात दरवर्षी अश्या अनेक घटना घडतात. हि चूक जी’वघेणी सिद्ध होते. अनेकदा लोकं थंडीपासून बचाव करण्यासाठी फायरप्लेस लावून दरवाजे आणि खिडक्या बंद करून झोपतात आणि धुरामुळे जीव गुदमरून त्यांचा मृ’त्यू होतो.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *